Tuesday, December 29, 2015

उस्ताद साबरी खाँ


उस्ताद साबरी खां (जन्म : मुरादाबाद, २१ मे, इ.स. १९२७; मृत्यू : दिल्ली, १ डिसेंबर, २०१५) हे एक सारंगीवादक होते.

अभिजात संगीताच्या दरबारात एके काळी अतिशय मानाचे स्थान पटकावणाऱ्या सारंगी या वाद्यावर कमालीची हुकमत गाजवणारे उस्ताद साबरी खाँ यांचे निधन ही खरोखरीच अतिशय दु:खद घटना आहे. एक तर हे वाद्य हळूहळू काळाच्या पडद्याआड चालले असताना, या उस्तादांनी तिला जिवंत ठेवण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे, तर ते लोकप्रिय करण्यासाठी आपले सारे जीवन समर्पितही केले. गायनाला साथसंगत करणारे हे वाद्य प्रत्यक्ष गळय़ातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले.
साबरी खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे १९२७ मध्ये झाला. त्यांनी सैनिया घराण्याची शैली पुढे नेली. खाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला.
सामान्यत: गायनाच्या संगतीचे हे वाद्य सतार आणि व्हायोलिन या वाद्यांच्या बरोबरीने उभे राहिले तेही साबरी खाँ यांच्यामुळे. येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले. संगीत कलेतील त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि पद्मभूषण या मानाच्या किताबांबरोबरच त्यांना उत्तर प्रदेशच्या साहित्य कला परिषदेचा पुरस्कार, उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बेगम अख्तर पुरस्कार, उस्ताद चाँद खान पुरस्कार, टागोर रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांचा मुलगा कमल साबरी हा तितक्याच जोमाने सारंगीवादनाचा वारसा पुढे नेत आहे. त्यांचे दुसरे पुत्र सरवर साबरी यांचा हात तबल्यावर तितक्याच कुशलतेने फिरतो. सारंगीतूनही वेगवेगळे मानवी भाव सहजपणे व्यक्त करण्याची कला साबरी खाँ यांना साधली होती. नव्याने वाद्य शिकू इच्छिणाऱ्या कलावंतांना साबरी खाँ हे आदर्श वाटत असत.
वादनास अतिशय अवघड असलेल्या सारंगीतून निघणाऱ्या स्वरांमधून जी जादू निर्माण करता येते, ती मात्र अतुलनीय अशीच असते. स्वत:ला तानसेनांचे वंशज मानणाऱ्या खाँसाहेबांनी सारंगीला भारतीय संगीताचे जे प्रतीक बनवले, त्यामुळे त्यांचे नाव इतिहासाला कधीच विसरता येणार नाही.
उस्ताद साबरी खाँ

अभिजात संगीताच्या दरबारात एके काळी अतिशय मानाचे स्थान पटकावणाऱ्या सारंगी या वाद्यावर कमालीची हुकमत गाजवणारे उस्ताद साबरी खाँ यांचे निधन ही खरोखरीच अतिशय दु:खद घटना आहे. एक तर हे वाद्य हळूहळू काळाच्या पडद्याआड चालले असताना, या उस्तादांनी तिला जिवंत ठेवण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे, तर ते लोकप्रिय करण्यासाठी आपले सारे जीवन समर्पितही केले. गायनाला साथसंगत करणारे हे वाद्य प्रत्यक्ष गळय़ातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले.
साबरी खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे १९२७ मध्ये झाला. त्यांनी सैनिया घराण्याची शैली पुढे नेली. खाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला.
सामान्यत: गायनाच्या संगतीचे हे वाद्य सतार आणि व्हायोलिन या वाद्यांच्या बरोबरीने उभे राहिले तेही साबरी खाँ यांच्यामुळे. येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले. संगीत कलेतील त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि पद्मभूषण या मानाच्या किताबांबरोबरच त्यांना उत्तर प्रदेशच्या साहित्य कला परिषदेचा पुरस्कार, उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बेगम अख्तर पुरस्कार, उस्ताद चाँद खान पुरस्कार, टागोर रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांचा मुलगा कमल साबरी हा तितक्याच जोमाने सारंगीवादनाचा वारसा पुढे नेत आहे. त्यांचे दुसरे पुत्र सरवर साबरी यांचा हात तबल्यावर तितक्याच कुशलतेने फिरतो. सारंगीतूनही वेगवेगळे मानवी भाव सहजपणे व्यक्त करण्याची कला साबरी खाँ यांना साधली होती. नव्याने वाद्य शिकू इच्छिणाऱ्या कलावंतांना साबरी खाँ हे आदर्श वाटत असत.
वादनास अतिशय अवघड असलेल्या सारंगीतून निघणाऱ्या स्वरांमधून जी जादू निर्माण करता येते, ती मात्र अतुलनीय अशीच असते. स्वत:ला तानसेनांचे वंशज मानणाऱ्या खाँसाहेबांनी सारंगीला भारतीय संगीताचे जे प्रतीक बनवले, त्यामुळे त्यांचे नाव इतिहासाला कधीच विसरता येणार नाही.
- See more at: http://www.loksatta.com/vyakhtivedh-news/ustad-sabir-khan-1166601/#sthash.LYbz08OR.dpuf

अभिजात संगीताच्या दरबारात एके काळी अतिशय मानाचे स्थान पटकावणाऱ्या सारंगी या वाद्यावर कमालीची हुकमत गाजवणारे उस्ताद साबरी खाँ यांचे निधन ही खरोखरीच अतिशय दु:खद घटना आहे. एक तर हे वाद्य हळूहळू काळाच्या पडद्याआड चालले असताना, या उस्तादांनी तिला जिवंत ठेवण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे, तर ते लोकप्रिय करण्यासाठी आपले सारे जीवन समर्पितही केले. गायनाला साथसंगत करणारे हे वाद्य प्रत्यक्ष गळय़ातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले.
साबरी खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे १९२७ मध्ये झाला. त्यांनी सैनिया घराण्याची शैली पुढे नेली. खाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला.
सामान्यत: गायनाच्या संगतीचे हे वाद्य सतार आणि व्हायोलिन या वाद्यांच्या बरोबरीने उभे राहिले तेही साबरी खाँ यांच्यामुळे. येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले. संगीत कलेतील त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि पद्मभूषण या मानाच्या किताबांबरोबरच त्यांना उत्तर प्रदेशच्या साहित्य कला परिषदेचा पुरस्कार, उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बेगम अख्तर पुरस्कार, उस्ताद चाँद खान पुरस्कार, टागोर रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांचा मुलगा कमल साबरी हा तितक्याच जोमाने सारंगीवादनाचा वारसा पुढे नेत आहे. त्यांचे दुसरे पुत्र सरवर साबरी यांचा हात तबल्यावर तितक्याच कुशलतेने फिरतो. सारंगीतूनही वेगवेगळे मानवी भाव सहजपणे व्यक्त करण्याची कला साबरी खाँ यांना साधली होती. नव्याने वाद्य शिकू इच्छिणाऱ्या कलावंतांना साबरी खाँ हे आदर्श वाटत असत.
वादनास अतिशय अवघड असलेल्या सारंगीतून निघणाऱ्या स्वरांमधून जी जादू निर्माण करता येते, ती मात्र अतुलनीय अशीच असते. स्वत:ला तानसेनांचे वंशज मानणाऱ्या खाँसाहेबांनी सारंगीला भारतीय संगीताचे जे प्रतीक बनवले, त्यामुळे त्यांचे नाव इतिहासाला कधीच विसरता येणार नाही.
- See more at: http://www.loksatta.com/vyakhtivedh-news/ustad-sabir-khan-1166601/#sthash.LYbz08OR.dpuf

Tuesday, June 23, 2015

धोंडुताई कुलकर्णी यांचे निधन

उस्ताद अल्लादिया खाँ यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात प्रस्थापित केलेल्या जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेतील गायिका गानयोगिनी धोंडुताई कुलकर्णी यांचे रविवारी मुंबईत बोरीवली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. धोंडुताईंच्या निधनाने जयपूर अत्रोली घराण्याच्या परंपरेतील तान हरपल्याच्या भावनेने संगीत क्षेत्रात व्यक्त होत आहे. आपल्या संगीत परंपरेत कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये अशा निष्ठेने शुद्ध परंपरा जपणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत या परंपरेशी एकनिष्ठ राहिलेल्या या महान गायिकेच्या निधनामुळे त्यांच्या शिष्यपरिवारावर शोककळा पसरली आहे.
अल्पचरित्र
कठोर संगीतसाधक
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या कलानगरीत २३ जुलै १९३७ रोजी जन्मलेल्या धोंडुताईंनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीत साधना सुरू केली. वयाच्या आठव्या वर्षां आकाशवाणीवर सादर केलेल्या गायनाच्या मैफिलीमुळे त्यांचे नाव संगीत क्षेत्रात पसरले. शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गानकला सादर करण्याची संधी मिळाली.
धोंडुताईंचे वडील कोल्हापूरमध्ये शिक्षक होते. ते ग्वाल्हेर घराण्याचे चांगले जाणकार होते. त्या काळात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात अल्लादिया खाँ यांचे पुतणे नत्थन खाँ यांच्या सुरांनी मंदिरातील पहाट प्रफुल्लित व्हायची. हे सूर कानावर पडावेत यासाठी लहानपणीच धोंडूताई मंदिरात जात असत. येथूनच त्यांचा कान आणि संगीताची जाण तयार झाली. धोंडूताईंना गाणे शिकवा, असे साकडे एके दिवशी त्यांच्या वडिलांनी नत्थन खाँ यांना घातले, आणि धोडूताई त्यांच्या शिष्या झाल्या. तीन वर्षांतच नत्थन खाँ यांनी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर अल्लादिया खाँ यांचे पुत्र भुर्जी खाँ यांनी महालक्ष्मी मंदिरात संगीत सेवा सुरू केली, आणि धोंडुताईंच्या वडिलांनी त्यांची भेट घेऊन धोंडूताईंना शिकविण्याविषयी विनंती केली. सूर्योदयाबरोबर सुरू होणाऱ्या या संगीत साधनेतून धोंडूताईंना आवाजाचा कस राखण्याचे कसब साधणे शक्य झाले. संगीताच्या शिक्षणासाठी धोडुताईंना शाळा सोडावी लागली. १९५० मध्ये भुर्जी खाँ यांचे निधन झाले. तोवर धोंडुताईनी त्यांच्याकडून संगीताचे सखोल ज्ञान आत्मसात केले होते. पुढे जवळपास सात वर्षे मार्गदर्शन नसतानाच्या काळात धोंडुताईंनी मैफिली सुरू केल्या. केसरबाई केरकर यांनी संगीत शिकण्यासाठी उत्सुक असलेल्यांना जाहीर निमंत्रण दिल्याने १९६२ मध्ये त्यांनी केसरबाईंना पत्र पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे गिरविण्याची इच्छा व्यक्त केली आणि धोडुताई केसरबाईंच्या शिष्या झाल्या. धोंडुताईंच्या संगीतावर केसरबाईंच्या शैलीचा प्रभाव होता. धोंडुताई स्वत नेहमी त्याचा आदरपूर्वक उल्लेखही करीत असत.
संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल धोंडुताईंना १९९० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
धोंडूताई कुलकर्णी यांच्या निधनामुळे एक करारी व खंबीर व्यक्तिमत्त्व आणि संगीताच्या सुवर्णकाळाच्या एक साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत, सांगीतिक आणि जीवनविषयक तत्वांच्या निष्ठेपायी त्यांनी कशाशीही तडजोड केली नाही. आयुष्यभर जे पटले, त्याचाच पाठपुरावा केला. संगीताच्या बाबतीत सांगायचे तर जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेची शुद्धता जपली आणि वैयक्तिक बाबतीत, संगीताची सेवा करण्यासाठी अविवाहित राहिल्या. त्यांनी कशाचाही मोह धरला नाही आणि लोकमान्यता, राजमान्यता यासाठी तत्वांशी तडजोड केली नाही. एक परिपूर्ण आयुष्य त्यांना लाभले. अखेरच्या काळात त्यांच्या शिष्यांनी त्यांची खूप सेवा करून गुरु-शिष्य परंपरेचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असल्याचे दाखवून दिले. एक परिपूर्ण आयुष्य जगलेल्या धोंडूताईंच्या निधनामुळे मातृछत्र हरवल्यासारखे वाटत आहे.
अश्विनी भिडे- देशपांडे, गायिका
धोंडूताई या आमच्या जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका होत्या. शुद्ध मोकळा आकारयुक्त बुलंद आवाज आणि स्वरांची भारदस्त मांडणी ही या घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े त्यांच्यात अंगभूत होती. या घराण्याची शुद्ध परंपरा त्यांनी जतन केली. किंबहुना जयपूर- अत्रौली घराण्याच्या गायकीबाबत धोंडूताईंचा शब्द अंतिम होता. जयपूर घराण्याची खास तालीम धोंडूताईंच्या गळ्यातून यापुढे ऐकायला मिळणार नाही. धोंडूताईंच्या निधनामुळे या घराण्याच्या परंपरेचे मूर्तिमंत अस्तित्व हरवले, याचे दु:ख वाटते.
रघुनंदन पणशीकर , गायक
======================================================================
Its been a year since Dhondutai passed away. By publishing above marathi except published in Loksatta on June 2, 2014, we want to remember Dhondutai and her gayaki. Thank you loksatta too.

Wednesday, March 19, 2014

स्वरायन: एका स्वरशताब्दीच्या निमित्ताने..

समाजातल्या वरच्या स्तरातच अभिजात संगीताला प्रवाही होण्याची मुभा असताना, गाणंच करायचं, असं गंगुबाई हनगल यांना का वाटलं असावं? दाक्षिणात्य संगीताचा त्या काळातच नव्हे, तर अगदी अलीकडेपर्यंत दबदबा होता तो अभिजन वर्गात. सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातल्या मुलींनी एक तर भरतनाटय़म या नृत्य प्रकारात प्रावीण्य तरी मिळवायचं किंवा कर्नाटक संगीतात पारंगत तरी व्हायचं, असा जणू दंडक असण्याच्या काळात गंगुबाई हनगल यांनी दाक्षिणात्य संगीताच्या वाटेला न जाता उत्तर हिंदुस्थानी संगीताकडे वळण्याचं कारण काय असेल? त्या धारवाडला राहत होत्या आणि तेव्हा धारवाड हे सांस्कृतिकदृष्टय़ा अगदीच मागासलेलं नव्हतं. तरीही त्यांच्याप्रमाणेच किती तरी आधी शेजारच्या कुंदगोळ गावातल्या रामभाऊ कुंदगोळकर यांनी किराणा घराण्याची तालीम घेण्यासाठी थेट अब्दुल करीम खाँसाहेबांनाच आपलं गुरू केलं होतं. रामभाऊ म्हणजे सवाई गंधर्व यांनीही कर्नाटकातच राहून गायनसेवा न करता तिकडे महाराष्ट्र देशी जाऊन तेथील त्या वेळच्या लोकप्रिय ठरलेल्या संगीत नाटकांत भूमिका करायलाही सुरुवात केली होती. त्यांची नाटय़गीतंही अस्सल मराठी रसिकांना भावत होती. परत कुंदगोळला येऊन गाणंच करायचं जेव्हा सवाई गंधर्वानी ठरवलं, तेव्हा तिथल्या सांस्कृतिक परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांना काही त्रास झाला असेल का, याची नोंद कुठे सापडत नाही. पण गंगुबाईंनी त्यांना गुरू केलं, तेव्हा ते खूपच नावारूपाला आले होते. कर्नाटकातील एक बडं प्रस्थ बनले होते आणि मैफली गवय्या म्हणून त्यांची ख्याती दूर पसरली होती. कर्नाटकात एक स्वतंत्र अशी संगीत परंपरा असतानाही ते हिंदुस्थानी संगीताच्या प्रांतात आले होते. गंगुबाईंच्या बाबतीतही हेच होतं. सवाई गंधर्वाकडे शिकण्यासाठी हुबळीहून कुंदगोळला रेल्वेनं ये-जा करायची हे निदान त्या काळात तरी निश्चितच अवघड वाटणारं होतं. ही छोटीशी मुलगी असा प्रवास करत आपला गळा एका अपरिचित संगीत परंपरेत मुरवत होती आणि त्याला विरोध करण्यासाठी तिथल्या समाजानं शक्य त्या सर्व पद्धतींचा अवलंब केला. गंगुबाईंचं घर काही अभिजन वर्गातलं नव्हतं खास. घरातल्या मुलींनी हौसेपुरतंच गाणं करावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवणाऱ्या समाजात गंगुबाईंनी एक मोठं क्रांतिकारक पाऊल टाकलं होतं.
यंदा जन्मशताब्दी पूर्ण होत असलेल्या गंगुबाई हनगल यांच्या साडेनऊ दशकांच्या जीवनात सुमारे ऐंशी र्वष तर गाण्यातच गेली. जी गेली, ती नुसती तालीम करून पाठांतर करण्यात गेली नाहीत, तर त्याआधी हिराबाई बडोदेकर यांनी केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीची मशाल सर्जनशीलतेनं तेवत ठेवण्यात गेली. ज्या काळात स्त्रीला गळ्यातून आर्तता व्यक्त करण्याचीही परवानगी नव्हती, त्या काळात पुरुषांच्या बरोबरीनं मैफलीत गाणं सादर करणाऱ्या हिराबाईंनी केलेल्या या अजब गोष्टीचं महत्त्व गंगुबाईंना चांगलंच समजलं असलं पाहिजे. त्यांच्या आईच्या गळय़ात मधुर संगीत होतं, पण ते कर्नाटक शैलीचं होतं. गंगुबाईंना उत्तर हिंदुस्थानी संगीताचं वेड असल्याचं लक्षात आल्यावर त्या माऊलीनं आपला गळा बंद ठेवायचं ठरवलं आणि मुलीच्या संगीत शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. किराणा घराण्याचे जनक अब्दुल करीम खाँ यांच्यासमोर गायला मिळण्याची संधी गंगुबाईंना मिळाली, पण त्यांच्याकडे शिक्षण मात्र घेता आलं नाही. त्यांचे शिष्य रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे गाणं शिकायचं ठरवलं तेव्हा कराव्या लागणाऱ्या कष्टाचं सोनं करण्याची हिंमत त्यांच्या मनात असली पाहिजे. १९३७ ते ४१ या काळात सलगपणे सवाई गंधर्वाकडे गाणं शिकायची संधी मिळाली, तेव्हा गांधारी या नावानं त्या जगाला परिचित झाल्या होत्या. या नावानं निघालेल्या त्यांच्या ध्वनिमुद्रिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. १९३२ ते ३५ या काळात ग्रामोफोन कंपनीसाठी त्यांनी साठ गाणी ध्वनिमुद्रित केली होती. रागसंगीत आणि मराठी भावगीतं असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांनी कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या अवकाशात गंगुबाई ऊर्फ गांधारीनं आपली सगळी तयारी कसून सादर केली होती. त्या काळात मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगुबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आली. 'आईचा छकुला' आणि 'बाळाचा चाळा' ही ती दोन गाणी तेव्हा घरोघर वाजत होती. 'हिज मास्टर्स व्हॉइस'नं १९३५ मध्ये प्रकाशित केलेल्या ध्वनिमुद्रिकेच्या लेबलवर छापलं होतं ते असं.. 'जून महिन्यात आम्ही प्रसिद्ध केलेला मिस गांधारीचा रेकॉर्ड इतका लोकप्रिय झाला की प्रमुख गायिकांच्या मालिकेमध्ये तिनं मानाचं स्थान पटकावलं आहे. या गायिकेसंबंधी लिहिताना 'विविध वृत्त' म्हणतो, 'एका गोड गळ्याच्या व अभिजात गायिकेचा परिचय करून देऊन 'हिज मास्टर्स व्हॉइस' कंपनीनं संगीताच्या अनेक शौकिनांना ऋणी केलं आहे. या चिजा इतक्या उत्तम वठल्या आहेत, की त्यामुळे या गायिकेचा उज्ज्वल भविष्यकाळ स्पष्ट दिसतो.. आजकालच्या भरमसाट तानाबाजीमुळे बधिर झालेल्या कानांवर गांधारी यांच्या मधुर आलापामुळे मधुसिंचन होईल.' (संदर्भ- सुरेश चांदवणकर) असं नावारूपाला आल्यानंतरही गंगुबाईंनी कष्टपूर्वक साधना करून सवाई गंधर्वाकडून तालीम घेतली आणि त्यात स्वप्रतिभेनं भर टाकली. गोड गळ्यावर झालेल्या आघातावर मात करून पुन्हा उभं राहण्याचं हे सामथ्र्य त्यांना हिंदुस्थानी संगीतानं दिलं. आईवडिलांचं छत्र हरपल्यानंतर पतीच्या निधनामुळे संगीताकडे पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पाहणं गंगुबाईंना भाग पडलं, पण समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावारूपाला येण्यासाठी आपल्या अंगच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेलाच आव्हान करणं त्यांना अधिक आवश्यक वाटलं असेल. चांगलं संगीत जगभर पोहोचलं पाहिजे, अशी कळकळ असून चालत नाही, त्यासाठी ते देशभर फिरून सादर करावं लागतं, हे लक्षात आल्यानंतर कृष्णा या आपल्या छोटय़ा मुलीला घेऊन त्या सगळीकडे गेल्या. केवळ पैसे मिळवणं हा उद्देश असता तर त्यांनी कदाचित अपेक्षेपेक्षा अधिक कमाई केलीही असती, पण गंगुबाईंना उत्तम संगीताचा ध्यास होता.

तोपर्यंत हिंदुस्थानी संगीत ही अभिजनांची मालमत्ता राहिलेली नव्हती. तंत्रज्ञानानं ते समाजातल्या सगळ्याच स्तरांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. बहुजन समाजातील अनेक जण आपल्यामध्ये असलेल्या प्रज्ञेचा आविष्कार करण्यासाठी धडपडत होते आणि त्याची अनेक उदाहरणं त्या काळातही ठळकपणे समोर येत होती. बाई सुंदराबाई, केशवराव भोसले ही त्यातली सहज लक्षात येणारी नावं. गंगुबाईंनी कर्नाटक संगीताचीच कास धरली असती तर असं झालं असतं का, असा प्रश्न मनात काहूर मात्र उठवतो. संगीत हे कोणत्या एका वर्गाचं अभिव्यक्तीचं साधन असता कामा नये, हे मान्य होण्यासाठी यंत्रयुग अवतरावं लागलं. तोपर्यंत सत्ताधीश असलेल्या सम्राटांच्या दरबारात किंवा अभिजनांनाच प्रवेश असलेल्या देवळांमध्ये अडकलेलं संगीत यंत्रयुग अवतरण्यापूर्वीच अण्णासाहेब किलरेस्करांच्या प्रयत्नानं खुलं झालं होतं. त्यांच्या संगीत नाटकांनी असं अभिजात संगीत कुणालाही ऐकण्याची मुभा निर्माण केली होती. यंत्रयुगानं हे प्रयत्न अधिक वेगानं आणि प्रभावीपणे पुढे नेले, पण त्यासाठी सामाजिक चौकटी मोडून पडण्याचीही आवश्यकता होती. संगीत नाटकांमध्ये स्त्रियांना काम करण्यास मुभा नसतानाच्या काळात विष्णू दिगंबर पलुस्करांनी मुंबईत १९०८ मध्ये गांधर्व महाविद्यालयात स्त्रियांचे स्वतंत्र गायन वर्ग सुरू केले होते. ही गोष्ट गंगुबाईंच्या जन्माच्याही आधीची. त्याचा संबंध महात्मा फुले यांच्या १८४८मध्ये सुरू झालेल्या मुलींच्या शाळेशी जोडता येतो. हा बदल गंगुबाईंच्या आगमनाला पूरक ठरला असल्यास नवल नाही. तरीही कर्नाटकातील त्या वेळची सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती पाहता, एखाद्या मुलीनं व्यावसायिक स्तरावर गायन या कलेला आपलंसं करावं, ही गोष्ट वाटते तेवढी किरकोळ नव्हती. 'संसार सोडून गाणं करते' अशा प्रकारच्या समाजाच्या हेटाळणीला सामोरं जावं लागणं ही तेव्हाची रीत होती, पण गंगुबाईंच्या खांद्यावर हिराबाईंनी दिलेली सांस्कृतिक क्रांतीची तेवती मशाल होती. आईवडिलांच्या पश्चात पतीचा पाठिंबा होता, म्हणून त्यांना हे करता आलं, हे विधानही त्यांच्या कर्तृत्वाला झाकोळून टाकणारं म्हणायला हवं. गाणंच करण्याचा निर्णय गंगुबाईंना कठोरपणेच घ्यावा लागला असणार, यात शंका नाही. समाजाच्या सर्व स्तरांत केवळ आपल्या अंगी असलेल्या अभिजाततेच्या गुणांनी पोहोचण्याची ही ताकद गंगुबाईंनी मिळवली आणि पुढच्या पिढय़ांकडे सुपूर्द केली. १३ मार्च १९१३ ला जन्मलेल्या या कलावतीच्या जन्मसाली तंत्रयुगातील एक मोठा चमत्कार मानल्या गेलेल्या जोहराबाई आग्रेवाली (१८६८-१९१३) यांनी जगाचा निरोप घेतला होता. गंगुबाई हनगल हे नाव त्यांच्या प्रतिभावान आविष्कारासाठीच केवळ आळवायचं नाही, तर कर्नाटकातील आणि देशातील सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अपार कष्टासाठीही आठवत राहणं आवश्यक आहे.
=======================================================================
 सदर लेख शनिवार, १५ मार्च  २०१४ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार

Friday, August 9, 2013

संगीत शिलेदार

jaymala shiledar: knight of music रंगभूमी अडचणीत असतानाच्या काळात जयमालाबाईंनी रंगभूमीवरच पाऊल टाकले. नंतर संगीत नाटक हेच आपले जीवनध्येय आहे आणि त्यासाठी होणाऱ्या कोणत्याही त्रासातून आपल्याला आनंदच मिळणार आहे, याची खात्री त्यांनी पुढील पिढीला दिली.
जयमालाबाई शिलेदार यांचा जन्मच संगीत नाटकासाठी झाला होता. जन्म झाला तोही याच संगीत नाटकाच्या परंपरेत मुरलेल्या नारायण जाधव यांच्या घरात. संगीत नाटके तेव्हा लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होती. चित्रपटाचे आगमन दादासाहेब फाळके यांनी करवले होते, पण त्याला बोलते करता आलेले नव्हते. समाजाला उच्च अभिरुचीचे संगीत काय असते, याचा अंदाज नाटय़संगीतामुळे आला होता आणि अभिजात संगीतही राजे आणि सम्राटांच्या दरबारातून समाजाच्या पुढय़ात येऊन ठेपले होते. जयमालाबाईंना जन्मल्यापासूनच ज्या नाटय़संगीताचे बाळकडू मिळाले, तेच आपल्या आयुष्याचे ईप्सित आणि सुखनिधानही असेल, याचा अंदाज येण्यासाठीही फार काळ जावा लागला नाही. संगीत नाटकांचा जन्म झाला, तेव्हा म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, नाटकातून स्त्रीला भूमिका करण्याची परवानगी समाजाने दिलेली नव्हती. एवढेच काय अशी नाटके पाहायलाही बराच काळ बंदी होती. सामाजिक क्षेत्रातील स्त्रीपुरुष भेदाभेदाच्या या साखळय़ा तोडून संगीत आणि नाटकही बाहेर पडायला बराच अवकाश जावा लागला. पण जयमालाबाईंच्या जन्मापर्यंत नाटकांमधून उच्च कुलातील मुलींना भूमिका करू देण्यास समाज राजी झाला होता. ती एक सांस्कृतिक क्रांतीच होती. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षांत पदार्पण करताना जयमालाबाईंनी आपल्या सुरेल गात्या गळय़ाला रंगभूमीला अर्पण करून टाकण्याचा निर्णय घेऊन टाकला. आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याचा कोणताही विचार न करता त्यांनी घेतलेला हा निर्णय अगदी शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती.
मोठाले डोळे, कपाळावर रुपयाएवढे कुंकू, हसतमुख चेहरा, अंगावर मोजकेच पण ठसठशीतपणे दिसतील असे दागिने, नीटनेटकेपणाने नेसलेली साडी आणि बोलताना होणारे मधुर उच्चार, रंगभूमीसाठी निश्चितच पुरेसे होते. पण तेवढय़ानेच भागण्यासारखेही नव्हते. संगीत रंगभूमीवर भूमिका करण्यासाठी या सगळय़ाच्या जोडीला, खरेतर काकणभर अधिकच, गळय़ात संगीत आवश्यक असते. जयमालाबाईंकडे तेही पुरेपूर होते. पदार्पणातच गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न कलावंताचे मार्गदर्शन मिळाल्याने चिंतूबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्यासारख्या दिग्गजांची शाबासकी मिळाली खरी, पण तोपर्यंत काळ बदलला होता. १९३१ मधील रुपेरी दुनियेच्या ‘बोलक्या’ अवतरणानंतर संगीत रंगभूमीचे वैभव ओसरायला लागले होते आणि तो सुवर्णकाळही पडद्याआड जाऊ लागला होता. महाराष्ट्राने जगाच्या संगीताला देणगी दिलेल्या या अवीट अशा संगीतप्रकाराची लोकप्रियता कमी झाली नसली तरीही रंगभूमी मात्र संकटात सापडली होती. जयमालाबाईंनी तशाही स्थितीत रंगभूमीवरच पाऊल ठेवण्याचे ठरवले. त्यानंतर आयुष्यात येणाऱ्या अपार कष्टांची चाहूल नसतानाही त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा ‘रामजोशी’ या चित्रपटातून आपल्या अभिनयकौशल्याने सगळय़ांची मने जिंकून घेतलेल्या तेव्हाच्या तरुण आणि होतकरू जयराम शिलेदारांशी त्यांची भेटही व्हायची होती. जयराम यांचे जयमालाबाईंच्या आयुष्यातील आगमन हा केवळ त्या दोघांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण नव्हता. त्यामुळे अडचणीत आलेल्या संगीत रंगभूमीला जीवदान मिळणार होते. झालेही तसेच. वयाच्या तेविसाव्या वर्षी जयमालाबाई आणि जयराम शिलेदार यांनी ‘मराठी रंगभूमी’ या संगीत नाटकाला वाहिलेल्या ‘नाटक कंपनी’ची स्थापना केली. लगेचच त्या दोघांनी रंगभूमीबरोबरच आपले आयुष्यही एकमेकांना अर्पून टाकण्याचे ठरवले. ज्या जिद्दीने जयमालाबाईंनी संगीत रंगभूमीवर पाऊल टाकले होते, ती जिद्द जागती ठेवण्यासाठी अचानकपणे आयुष्यात आलेल्या जयराम यांनी जी साथसंगत केली, त्याने मराठी संगीत रंगभूमीवर एक नवा दीपत्कार घडला.
चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नाटक हा कलाप्रकारच जिवंत राहतो की नाही, अशी परिस्थिती असताना छोटा गंधर्वासारखा एक अतिशय गोड गळय़ाचा कलावंत ती कला जिवंत ठेवण्यासाठी झटत होता. चित्रपटाच्या आगमनानंतर बालगंधर्वानाही प्रभात चित्रच्या ‘संत एकनाथ’ या चित्रपटात भूमिका करण्याचा मोह आवरता आला नव्हता. चित्रपटाच्या या दुनियेत आपले मन रमणार नाही, याची पुरेपूर खात्री असतानाही रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी खुद्द बालगंधर्वानी केलेले अनेक प्रयत्नही रसिकांच्या पचनी पडत नव्हते. चित्रपटाकडे वळलेल्या रसिकांना परत वळवण्यासाठी छोटा गंधर्वानी जे प्रयत्न केले, त्याला तोड नाही. पण त्यांच्या प्रयत्नांनाही पडणाऱ्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची हिंमत शिलेदार पती-पत्नीने दाखवली आणि आजपर्यंत ही रंगभूमी टिकवून ठेवण्यात अतिशय मोलाचा वाटा उचलला. एकाच वेळी संसार, गायन, अभिनय, संस्थेची जबाबदारी, नाटकांचे गावोगावीचे दौरे अशा अनेक पातळय़ांवर लढाई करणाऱ्या जयमालाबाईंनी हे सारे श्रम आपल्या चेहऱ्यावर तसूभरही उमटू न देण्याची खबरदारी घेतली. संगीत रंगभूमी हाच आपला धर्म आणि तोच आपला ध्यास, असे जीवन जगताना येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करण्यासाठी मन फारच खंबीर लागते. जयमालाबाईंना जयरामांच्या मदतीने तसे ते ठेवता आले. जोडीला कन्या कीर्ती आणि दीप्ती यांची सांगीतिक कारकीर्द फुलवत ठेवण्याचीही जबाबदारी या पालकांनी अतिशय आनंदाने स्वीकारली. शिलेदारांचे सारे कुटुंबच संगीत रंगभूमीसाठी आपले आयुष्य अर्पण करायला तयार झाले, याचे महत्त्वाचे कारण निष्ठा हे होते. ती जराही ढळू न देण्यासाठीचा निग्रह त्यांच्यापाशी होता. बालगंधर्वानी नाटय़संगीताला अभिजाततेच्या भरजरी वस्त्रांनी झळाळून टाकले होते. नाटय़संगीतातील तो एक मानदंड झाला होता आणि त्यालाही आपल्या प्रतिभेने नवे आव्हान देत मा. दीनानाथ आणि केशवराव भोसले यांच्यासारख्या कलावंतांनी ही रंगभूमी उजळून टाकली होती. दंतकथांनी भरलेल्या आणि त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात भरून राहिलेल्या या नाटकांनी तेव्हाचे कलाजीवन समृद्ध केले होते.
जयमालाबाईंनी ही समृद्धी आणखी वाढवली आणि आपल्या कलागुणांनी तिला स्वराभिनयाच्या दागिन्यांनी नखशिखान्त मढवले. नाटय़संगीताच्या बरोबरीने अभिजात संगीताच्या क्षेत्रात आवडीने मुशाफिरी करत त्यांनी अखेपर्यंत आपला गळा गाता ठेवला. मराठी रंगभूमी या संस्थेतर्फे संगीत रंगभूमीला पुन्हा जीवदान देणाऱ्या शिलेदारांनी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि त्यानंतर आलेल्या असंख्य नव्या आकर्षणांच्या मोहजालातही संगीत नाटक रसरशीतपणे जिवंत ठेवले. कीर्ती शिलेदार यांनी त्यात घातलेली भर अधिकच मोलाची. नव्या नाटकांची निर्मिती करत असताना परंपरेने आलेल्या नाटकांना नवा रंग देण्यासाठी हे सारे कुटुंब आयुष्यभर झटले.  पुरस्कार आणि मानमरातब वाटय़ाला येण्यासाठी आतासारखे माध्यमांचे मोहजाल नसतानाच्या काळात जयमालाबाईंनी अतिशय खडतरपणे आयुष्य व्यतीत केले. पण या साऱ्या वेदनांचा, कष्टाचा खासगीत किंवा जाहीरपणे उच्चारही न करण्याची अभिजातता त्यांच्यापाशी होती. संगीत नाटक हेच आपले जीवनध्येय आहे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या त्रासातून आपल्याला मनोमन आनंदच मिळणार आहे, याची खात्री जयमालाबाईंनी पुढील पिढीला दिली आहे. कलावंताच्या चेहऱ्यावरील रंग उतरले की उरते ते वास्तव. त्याला सामोरे जाण्याचे धैर्यही जयमालाबाईंनी अभिनयातून आणि संगीतातूनच मिळवले. ज्यासाठी आपण जन्मलो, ते कार्य अखेपर्यंत करत राहता येण्याचे भाग्य त्यांना मिळाले. त्यांचे निधन केवळ शोकात्म नाही, तर नवी जिद्द निर्माण करणारे आहे!
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, ९ ऑगस्ट २०१३ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार

जयमाला शिलेदार

jaymala shiledar: knight of music जयमाला शिलेदार या पूर्वाश्रमीच्या प्रमिला जाधव. इंदूर येथे भाटेबुवांच्या नाटय़कला प्रवर्तक कंपनीच्या बिऱ्हाडी २१ ऑगस्ट १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षांपासून संगीत शिक्षण घेणाऱ्या प्रमिला यांनी १९४२ मध्ये गोविंदराव टेंबे यांच्या 'वेषांतर' या नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़महोत्सवात १९४५ मध्ये 'संगीत शारदा' या नाटकामध्ये त्यांनी बालगंधर्व, केशवराव दाते आणि चिंतामणराव कोल्हटकर या नटश्रेष्ठांसमवेत ताकदीने भूमिका रंगविली. १९४७मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. १९६२ मध्ये संगीत अलंकार ही पदवी त्यांनी संपादन केली.
 कीर्ती, लता आणि सुरेश अशा तीन भावंड शिलेदारांचे 'सौभद्र' १९६२ मध्ये रंगभूमीवर आले. जयमाला शिलेदार यांनी ४६ संगीत नाटकांमध्ये ५२ भूमिका रंगभूमीवर साकारल्या, तर १६ नाटकांचे संगीतदिग्दर्शन केले. सलग २५ वर्षे नायिकेच्या भूमिकेत कार्यरत असल्याबद्दल १९७६ मध्ये त्यांचा सत्कार झाला होता. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षांत १९८७ मध्ये सव्वाशेहून अधिक संगीत नाटय़प्रयोग सादर करून त्यांनी बालगंधर्वाना अभिवादन केले. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर २१ वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी संस्थेची धुरा पेलली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत १२ वेगवेगळय़ा नाटकांचे ५० प्रयोग करण्यात आले. त्यांच्यावर २००१ मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली, मात्र दोन महिन्यांतच त्यांनी पुन्हा नाटय़संगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली.
गंधर्वगायकीची शिलेदारी हरपली: मान्यवरांची श्रद्धांजली
संगीत रंगभूमीसाठी सर्वस्व अर्पण करून रसिकांना आनंद देणाऱ्या आणि मराठी रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून संगीत रंगभूमीचे जतन करणाऱ्या जयमाला शिलेदार यांच्या निधनामुळे गंधर्वगायकीची शिलेदारी हरपली आहे, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीप्ती भोगले : जयमाला शिलेदार ही जशी माझी आई होती त्याहून अधिक ती आम्हा बहिणींची गुरू म्हणून मोठी होती. मी, कीर्ती आणि सुरेश अशा तिघा भावंडांचे 'सौभद्र' रंगमंचावर आले त्यामागे तिने आमच्या गायकीवर घेतलेली मेहनत कारणीभूत आहे. शाळेतून आल्यावर दुपारी हार्मोनिअम घेऊन आमचा रियाझ करून घ्यायची. अशी वर्षभर आमची रंगीत तालीम झाली होती. गायन शिकविताना गाण्याचे शब्द तर तिने सांगितले. पण, आलापी सांगायची नाही. आम्ही आमचे सूर काढून गायचो. त्यामुळे आमची शैली जपता आली.
शैला दातार : गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्य बालगंधर्व यांची गायकी जपणाऱ्या जयमालाबाईंचा संगीत रंगभूमी हाच श्वास होता. नाटय़संगीत गायनामध्ये त्या आमच्या पिढीतील कलाकारांसाठी आदर्श होत्या.
पं. विनायकराव थोरात : बालगंधर्वाची गायकी जपणाऱ्या शिलेदार कुटुंबीयांसमवेत ५० वर्षे तबलासाथ करताना माझे जीवनच संगीतमय झाले आहे. गायकाकडे लय, ताल यांसह सुरेलपणा असेल आणि पल्लेदार ताना त्याच्या गळ्यातून आल्या तरच त्या गायकाला गंधर्वगायकी जमते. ही कला जयमालाबाईंनी आत्मसात केली होती.
अरविंद पिळगावकर : अभिजात संगीत नाटकात ज्यांनी 'शिलेदारी'केली त्या पिढीतील शेवटचा दुवा जयमाला शिलेदार यांच्या निधनाने निखळला आहे. अभिजात संगीत नाटकात त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर झाल्या. मला त्यांच्याबरोबर 'एकच प्याला', संगीत सौभद्र', 'संगीत स्वयंवर' या नाटकांमधून काम करण्याची संधी मिळाली. संगीत नाटकाचा वसा त्यांनी घेतला होता. हा वसा त्यांनी लता आणि कीर्ती या त्यांच्या दोन मुलींकडे पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दिला.
शुभदा दादरकर : जयमाला शिलेदार यांच्याशी आमचे कौटुंबिक आणि खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. संगीत रंगभूमीवर पद्य आणि गद्य कसे सादर करायचे याचा त्या आदर्श होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि हसतमुख होता. त्या स्वत: हार्मोनियमही चांगल्या वाजवायच्या. संगीत नाटकात गाणे सादर करताना शब्दांची फेक, त्याचा स्वर उच्चार आणि गाताना स्वरांची गोलाई व गोडवा कसा कायम ठेवायचा हे अवधान त्यांनी कायम सांभाळले.
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, ९ ऑगस्ट २०१३ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार

Tuesday, July 30, 2013

'श्रुती' रंगी रंगले... भाग-२

कही दिल लगायाँ है?
एकदा मी बाहेरगावहून नुकतीच परतले होते. घराचं दार उघडून आत शिरतेय तेवढय़ात फोन वाजला. फोनवरून विचारणा झाली, 'श्रुतीजी है.. मैं बेगम अख्तर बोल रही हँू..',  माझ्या हातातून फोन फक्त पडायचाच बाकी राहिला होता. यांचा फोन मला कशाला, असा विचार मनात आला. त्या मला म्हणाल्या, हमने आपके आवाज की बहुत तारीफ सुनी है. तो हमें आपका गाना सुनना है. कब सुनाऐंगी..'. मी त्यांना म्हटलं की आत्ताच घरी आले आहे. उद्या ऐकवले तर चालेल का? त्यावर 'नहीं नहीं कल मैं लखनौ जा रही हूँ.. तो हमें आपका गाना आज ही सुनना है,' असे म्हणत त्या माझ्या गुरूंबरोबर घरी आल्या. जून महिन्यातला असाच भरपूर पाऊस होता. इतक्या भिजल्या होत्या त्या.. पण, तरीही 'तुम्ही गा' म्हणाल्या.. 'कपडे आपोआप सुकतील', असं त्यांनी सांगितल्यावर मी गायला सुरुवात केली. मग त्याही गायल्या. त्या दिवशीचं त्यांचं गाणं मी रेकॉर्ड करून ठेवलंय, कारण माझ्यासाठी तो प्रसाद होता. गाऊन झाल्यावर त्यांनी मला हळूच विचारलं, 'श्रुतीजी कहीं दिल लगाया है?' त्यांच्या त्या प्रश्नावर मी पुरती गोंधळून गेले होते. समोर घरातली सगळी मंडळी, गुरू सगळेच होते. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून त्यांनी सांगितलं, 'नहीं..नहीं..हम किसी का नाम नहीं पूछ रहे है.' मला काय बोलायचं कळेना. मग त्या म्हणाल्या, 'देखिए.. दिल है. खूब लगाईए.. दिल ही है. तुट जाएगा. बार बार तुटेगा. जितनी बार तुटेगा उतना दर्द बढेगा. और वोह दर्द जब आपकी आवाज में उतरेगा तो आपकी आवाज तो सोने पे सुहागा बन जाएगी.'  
भातखंडे विद्यापीठाची कुलगुरू होणं सहजसोपं नव्हतं
२००८ मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून मी रूजू झाले आणि २००९ मध्ये उत्तरप्रदेशच्या राज्यपालांनी माझी भातखंडे संगीत विद्यापीठाची कुलगुरू म्हणून थेट नियुक्ती केली. पण, मी उत्तरप्रदेशमध्ये गेल्या गेल्याच तुम्ही इथे येऊ नका, तुमचा काही फायदा होणार नाही, असं ऐकवण्यात येऊ लागलं. विद्यापीठातल्या काही लोकांना माझ्यासारखी सरळ व्यक्ती तिथे येणं सोयीचं नव्हतं.  मी गेल्या दिवसापासून माझ्याविरोधात कारवाया सुरू झाल्या. मी तिथे येऊ नये म्हणून तिथल्या लोकांनी माझ्याविरोधात संप करणे, माझे पुतळे जाळणे, वर्तमानपत्रातून टीका करणे, अगदी माझ्यावर खुनाचा आळ घेण्यापर्यंत विरोधी कारवाया करून पाहिल्या. पण, नंतर काय करायचं हे त्यांच्या लक्षात येईना. कारण काही केल्या मी तिथून जात नव्हते. शेवटी मी त्यांना बजावून सांगितलं की, तुमचे हे हीन प्रकारचे चाळे आहेत त्याला उत्तर देण्यासाठी मला तुमच्या पातळीवर खाली यावं लागेल. कुलगुरूची ही खुर्ची त्यासाठी नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. मी कुठल्याही प्रकोरे तुम्हाला उत्तर देणार नाही. पण, कायद्याने त्यांचा जो काही बंदोबस्त करायचा होता तो मी केला. त्यांची सगळी बंडं मी मुळातून मोडून काढली.
कर्नाटकी संगीतातला बंदिस्तपणा आणि ख्याल गायकीतलं स्वातंत्र्य
कर्नाटक संगीतात एक बंदिस्तपणा आहे. त्यांची ती बांधीलकी आहे. म्हणजे बंदिशीमध्ये त्यांच्या ज्या कृती आहेत, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला एका मर्यादेपर्यंतच वाव देऊ शकता. त्याउलट, उत्तर हिंदुस्थानी संगीतात ध्रुपद धमार मागे पडून ख्याल जास्त प्रचारात आले. कारण, ख्यालामध्ये स्वत:च्या कल्पनाशक्तीलासुद्धा वाव मिळाला, त्यामुळे ही गायकी जास्त प्रचारात आली. इथेही घराणेशाहीची एक चौकट आखून दिलेली आहे. ही मर्यादा घालून दिलेली आहे.. रागाचा विस्तारही तुम्ही या एवढय़ा मर्यादेत करायचा. पण, ही बंधनं पाळूनसुद्धा त्या गायकीत एक स्वातंत्र्य आहे. ख्याल गायकी म्हणजे काय तर बंधनातलं स्वातंत्र्य. हे बंधनातलं स्वातंत्र्य ज्या ज्या गायकीतील घराण्यांनी दिलं, ज्या विचारप्रणालींनी दिलं, त्या विचारप्रणाली जास्त प्रसृत झाल्या. तसं दाक्षिणात्य संगीतात होत नाही. त्यांचा बंदिस्तपणा आहे तसाच आहे. तुम्ही बघाल तर त्यांच्या गायन महोत्सवात कोणी एखादा व्यासपीठावर गात असेल तर तो जसा मांडीवर हाताने ताल धरतो तसाच ताल समोर बसलेल्या श्रोत्यांनीही धरलेला असतो. ते सगळे ती कृती गात असतात. म्हणजे त्यांच्या कृतीतलं जे एक बंदिस्तपण आहे तेच त्यांच्या प्रसारासाठी एक प्रकारे मारक ठरलं.
उत्तर पैदा करती है, दख्खन दाद देती है..
उत्तर भारतात कलांचा जन्म झाला पण प्रसार मात्र दक्षिणेत जास्त झाला. खाँसाहेब म्हणायचे, उत्तर पैदा करती है.. दख्खन दाद देती है. मी उत्तरेत बराच प्रवास केलेला आहे. उत्तरेत ज्या गोष्टीत पटकन यश मिळत नाही, त्या गोष्टींवर काम करायला आज तिथे कोणी तयार नाही. शिवाय, उत्तरेतली भौगोलिक परिस्थितीत आणि निर्माण झालेली ऐतिहासिक-राजकीय परिस्थिती यामुळे लोकांच्या मनात असुरक्षितता असायची आणि तिथे प्रचलित असलेल्या संगीतप्रकारामुळे कलाकारांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. कलाकार होणे म्हणजे तुम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अशी परिस्थिती होती. दुसरी गोष्ट अशी झाली की विद्येसाठी आणि अभ्यासासाठी पोषक असं स्वास्थ्य, तशी मनोभूमी दक्षिणेकडे जास्त होती. आपल्याकडे उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी-कर्नाटक संगीत असे दोन संगीतप्रवाह निर्माण झाले. दक्षिणेकडे घरटी एक कुठले वाद्य वाजवले जाई, एखादा नृत्यप्रकार शिकवला जाईल नाही तर गाणे तरी गायले जाईल. म्हणजे घरटी कोणीतरी कलेची ओळख असलेला कलाकार तुम्हाला सापडेल. तसे उत्तरेत होत नाही, कारण त्यांच्यासाठी आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे ध्येय झालेले आहे आणि अशा ठिकाणी कला कधीच रुजत नाही, तिचे संवर्धन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मानसिंग तोमर वगैरे मंडळी होती, त्यांनी कलेची जपणूक आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पण, त्यांच्या काळातही त्यांना जी शिष्य मंडळी मिळाली ती तुम्ही बघाल तर दक्षिणेकडची होती, महाराष्ट्रातील होती.
आणखी एक म्हणजे संगीतात घराणेशाही होती, त्या घराणेशाहीत माझी विद्या माझ्या रक्तातील माणसाकडेच गेली पाहिजे अशी पूर्वी भावना असायची. माझी विद्या माझ्या घरातच राहिली पाहिजे, असा एक दंडक होता. बरं विद्येची शान तर अशी की, लग्नामध्ये जावयाला हुंडा म्हणून मी २५ राग दिले, शंभर राग दिले किंवा २०० बंदिशी दिल्या. याचा अर्थ असा की त्या २०० बंदिशी, ते २५ राग मी आयुष्यात कधीही गायचे नाहीत. म्हणजे घराणेशाहीतही विद्येवरची निष्ठा ही अशी होती. आणि ही विद्येची निष्ठा प्राणपणाने जपली गेली ती कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अगदी मध्य प्रदेशातही कृष्णराव पंडितांसारखी जी मंडळी होती, त्यांनी विद्या ही आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठं धन मानले. हा विद्येबद्दलचा पूज्यभाव उत्तरेत असूनसुद्धा तिथे कलेची संवर्धन होण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे मग ही मंडळी दक्षिणेकडे आली.
संगीत हे प्रेमासारखे असतं..
व्याकरणात संगीत नोंदलं गेलं म्हणजे ते कमी दर्जाचं होतं, असं नाही. संगीतात कलाकाराची आंतरऊर्मी असते.. म्हणजे मला जेव्हा एखादा कॅनव्हास देऊन त्यावर काम करायला सांगितलं जातं तेव्हा त्या कॅनव्हासपुरतं मर्यादित होण्याचा प्रयत्न मी करते. पण, मला माहिती असतं की जर मला आणखी एक कॅनव्हास त्याच्या शेजारी मिळाला असता तर माझा जो स्ट्रोक आहे तो मला पूर्णत्वाला नेता आला असता. आता या एकाच कॅनव्हासमुळे माझ्या त्या स्ट्रोकची गती थांबल्यासारखी होते, ही जी संकल्पना आहे त्याचा ख्यालामध्ये उपयोग होतो.
आपण प्रत्येक वेळी जेव्हा मोझार्टच्या सिंफनी ऐकतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्यापरीने अर्थ लावत असतात. ते नुसतेच लिहिलेले नोटेशन वाजवत नसतात. त्याचा जो प्रत्येकाला उलगडणारा गर्भितार्थ आहे तो महत्त्वाचा असतो. कुठलंच संगीत हे कमी दर्जाचं नसतं. संगीत हे प्रेमासारखे असतं. जसं लहानपणी केलेलं प्रेम हे त्या वेळेला तितकंच शंभर टक्के खरं असतं. तसंच मोठेपणी समजून घेऊन, आयुष्यातलं सत्त्व बरोबर घेऊन मग आलेलं प्रेमही तितकंच खरं असतं. मग ते प्रेम नुसतंच दैहिक असेल असं नाही. तर ते वाचनाचं प्रेम असेल, वस्तूवरचं प्रेम असेल, आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांवरचं प्रेम असेल. ते कोणत्याही वयात असलेलं प्रेम हे तितकंच खरं असतं. अगदी तसंच संगीताचं आहे.
राग हे नुसतं व्याकरण नाही. ते एक्स्प्रेशन आहे
शास्त्रीय संगीताला घराणेशाहीची चौकट असली तरी त्या त्या घराण्यांची सौंदर्यपूर्ण वैशिष्टय़ आहेत. घराण्यामुळे दृष्टी संकुचित होणार नाही, याची काळजी घेत गात राहिले. तसंच गाण्याचं वैशिष्टय़ स्वरांच्या लगावात आहे. म्हणूनच प्रत्येक वेळी यमन ऐकला तरी त्याचा कंटाळा येत नाही. गाताना तो प्रत्येकाच्या लगावाच्या दृष्टीने बदलत जातो, त्या लगावात गोडवा आहे. वैशिष्टय़ आहे. शास्त्रीय संगीतातल्या रागांचही तसंच आहे. राग म्हणजे नुसतं व्याकरण नाही. ते एक्स्प्रेशन आहे. म्हणणं आहे.
पं. पलुस्करांमुळे संगीत मध्यमवर्गीय घरात आलं
पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी संगीताला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं होतं. शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार आणि शिक्षण हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. सभ्य घरांतील लोक त्या काळात संगीताकडे हिणकस नजरेने बघत. गाणं-बजावणं चांगलं नाही, ही त्या काळी ठाम समजूत होती. पं. पलुस्करांनी तत्कालीन समाजाला या मन:स्थितीतून बाहेर काढण्याचा जणू विडाच उचलला होता. माझ्या वडिलांचे ते गुरू! वडील शालेय शिक्षणात पाचवीपर्यंतच शिकले. मात्र पं. पलुस्करांकडे त्यांचे सर्वच बाबतीतील शिक्षण झालं. आपल्याकडे असलेल्या मुलांचा सगळा वेळ कामात किंवा अभ्यासात जावा, याकडे बुवांचं काटेकोर लक्ष असायचं. अल्लड वयातील मुलांना बरोबर घेऊन संगीताची दीक्षा देणं, हे त्याही वेळी कठोर काम होतं. पण बुवांनी या मुलांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी त्यांना इंग्रजी, गणित, संस्कृत आणि हिंदी या विषयांच्या शिकवण्याही लावल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच माझ्यासारख्या अनेक गायिका पुढे मुक्त कंठाने गाऊ शकल्या. कोणतीही कला ही एक शास्त्र, विद्या असते, ही शिकवण कदाचित बाबांना त्यांच्याकडूनच मिळाली. पुढे बाबांनी माझ्यावर त्याचप्रमाणे संस्कार केले. संगीताचा सखोल अभ्यास, त्याकडे पाहण्याची दृष्टी, ती कला म्हणजे विद्या आहे, तिला विद्येचे अधिष्ठान आहे, वगैरे सगळ्या गोष्टींचा आवाका वडिलांनीच समजावून दिला.
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, २६  जुलै २०१३ च्या लोकसत्ताच्या 'व्हिवा' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

'श्रुती' रंगी रंगले... भाग-१

व्हिवा लाउंजमध्ये सोमवारी ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर- काटकर यांनी रसिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या 'रामरंगी रंगले'च्या स्वरांनी प्रभादेवीचं पु. ल. देशपांडे मिनि थिएटर भारलं गेलं. श्रुतीताईंच्या स्वरांबरोबरच त्यांच्या विचारांनीही उपस्थित भारावून गेले.
श्रुती या नावातच संगीत!
शास्त्रीय संगीतात श्रुती या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वरांबरोबर येणाऱ्या श्रुतीही सांभाळून गाणाऱ्या गायकाला या क्षेत्रात खूप मान आहे. तोच धागा पकडून श्रुती सडोलीकर-काटकर यांना त्यांच्या नावाबद्दल विचारले असता, त्यांनी त्यांचे गुरू व वडील वामनराव सडोलीकर यांची आठवण सांगितली. वामनरावांना एकदा कोलकातामध्ये एका माणसानं विचारलं होतं की, तुमच्या मुलीचे नाव श्रुती कोणी ठेवले आणि का ठेवले? त्यावर वामनरावांनी त्यांना उत्तर दिले होते, 'श्रुती हे नाव मीच ठेवले आहे. माझी मुलगी गाणार याची मला खात्री होती आणि ती सर्व श्रुती सांभाळून गाणार, याची पूर्ण खात्री होती.'
हिंदुस्थानी संगीतातलं जयपूर-अत्रौली घराणं कठीण गायकीसाठी ओळखलं जातं. याच घराण्यातल्या श्रुती सडोलीकर-काटकर यांनी मात्र आपल्या आर्त स्वरांनी शास्त्रीय संगीत एकदमच हृदयाला भिडवलं. 'व्हिवा लाउंज'च्या मंचावर त्यांनी संगीताबद्दलची आपली मतं आत्मीयतेनं मांडली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात आपल्या गुरूंबद्दल बोलताना त्या भावविवश झाल्या. श्रुतीताईंचे गानविचार आणि एकूणच आयुष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन या गप्पांतून ऐकायला मिळाला. वेळ संपली तरी श्रुतीताईंशी संवाद संपलेला नव्हता. गुरूंनी भरभरून दिलं, हे सांगणाऱ्या श्रुतीताईंना ऐकताना प्रेक्षकांचीही अवस्था घेता किती घेशील दो कराने, अशीच झाली होती.
अति कौतुक घातकच
सध्या रिअ‍ॅलिटी शोजच्या नावाखाली टीव्हीवर जे काही चालले आहे, ते संगीतासाठी मारक आहे. रिअ‍ॅलिटी शोमधून तुम्हाला चांगले गायक मिळू शकतात. मात्र संगीत ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. शिकणं ही मनाची अवस्था आहे. रिअ‍ॅलिटी शोजमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे 'बन चुके' ही भावना मनात निर्माण होते. अशा शोजमधून चमकलेल्या मुलांचे पालक त्यांचं अति कौतुक करतात. या मुलांच्या वयात हे कौतुक  हवंहवंसंच वाटतं, पण हे अति कौतुकच त्यांच्या प्रगतीसाठी घातक ठरतं. या मुलांच्या अंगात गुण नक्कीच असतात, पण त्या गुणांना खतपाणी घालण्याची गरज आहे. नाहीतर चौथ्या वर्षीचं गाणंच ते १४ व्या वर्षी गात राहतात. त्या वयात पडती प्रतिष्ठा सहन होत नाही. म्हणून या मुलांना अधिकाधिक अभ्यास करू दे. पैसा त्यांना नंतरही मिळेल. पण हे वय अधिकाधिक शिकण्याचं आहे. त्यांच्या कलेला विद्येचं अधिष्ठान मिळणं गरजेचं आहे. या सगळ्यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. माझ्या सुदैवाने माझ्या आईवडिलांनी माझ्यासमोर कधीच माझे कौतुक केलं नाही. गुरूंनीही माझ्या पाठीवर शाबासकीची थाप खूप उशिराच मारली. वडील तर नेहमी म्हणायचे की, लहान मुलं टीपकागदासारखी असतात. घरात संगीत आहे त्यामुळे श्रुती लहान वयात गाते, हे काही फार आश्चर्य नाही. ज्या दिवशी ती स्वतचं म्हणून गाणं गाईल त्या दिवशी तिला बोलवा, असं ते सांगायचे.
करडय़ा शिस्तीचे संस्कार
गाण्याच्या बाबतीतील शिस्तीचं महत्त्व वडिलांनी मला खूप लहानपणी समजावून दिलं. अगदी अडीच-तीन वर्षांची असल्यापासून मी अत्यंत अनवट राग, मिश्र राग वगैरे गात होते. मात्र कधी कधी कंटाळा यायचा. वडिलांकडे मी कधी शिकायला म्हणून बसले नव्हते. मात्र त्यांच्याकडे एक मुलगी शिकायला येत असे. ती चुकली की मग पुढे काही गातच नसे. तिची भीड चेपावी म्हणून वडिलांनी मलाही तिच्याबरोबर शिकायला बसवले. गाताना मांडीवर हाताने ताल देणे, हे माझ्यासाठी खूपच कंटाळवाणे होते. एकदा मला खूपच कंटाळा आला होता म्हणून मी हात दुखत असल्याचा बहाणा केला. वडिलांच्या ते लक्षात आले. मात्र ओरडणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यामुळे त्यांनी मला अगदी लाडाने जवळ बसायला बोलावले. 'माझ्या बाबाचा हात दुखतोय, अरेरे', असं म्हणत त्यांनी स्वत:च्या हाताने माझ्या मांडीवर जोरजोरात ताल द्यायला सुरुवात केली. बाबांचा हात खूप लागत होता, पण मीदेखील हट्टाने काही न बोलता तशीच गात राहिले. शिकवणी संपल्यानंतर तशीच दुखऱ्या पायाने खेळायलाही गेले. मात्र रात्री आईबाबांचा संवाद ऐकला आणि डोळ्यांत पाणी आलं. माझे बाबा त्या रात्री जेवले नव्हते. आईने त्यांना कारण विचारलं तर ते म्हणाले, 'ज्या हाताने मी माझ्या मुलीला मारलं, त्या हाताने मी आज कसा जेवू? पण या वेळी तिला शिस्तीचं महत्त्व पटवून देणं गरजेचं होतं. नाहीतर पुढे तिलाच त्रास झाला असता.' या एका प्रसंगाने गाण्यातलीच नाही, तर एकंदरीत आयुष्यातही शिस्तीचं महत्त्व पटलं.
गुरुंचा विश्वास माझी पुण्याई
शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडिलांकडे सुरू करण्याआधीपासूनच मला अनेक बंदिशी मुखोद्गत होत्या. त्यामुळे वडिलांचे अनेक स्नेही घरी येऊन मला एखाद्या रागातील बंदिश, तानापलटे वगैरे गायला सांगत. असेच गुलुभाई जसदनवाला वडिलांकडे आले. त्यांनी मला गाताना ऐकलं व म्हणाले, 'माझ्याकडे भरपूर विद्या आहे, पण ती विद्या मी द्यावी असा शिष्य काही सापडला नाही. तुमची मुलगी गाते, तर तिला माझ्याकडे गाणं शिकवायला पाठवाल का?' वडिलांनी हरकत घ्यायचा प्रश्नच नव्हता. माझं शिक्षण गुलुभाईंकडे सुरू झालं. गुलुभाई म्हणजे जबरदस्त असामी होते. ते केवळ संगीतातील गुरूच नव्हते, तर बडे व्यावसायिक होते. त्यांच्या पदरी रेसचे घोडे होते, भाताची शेती, बांधकाम वगैरे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. १६ ऑगस्ट १९६८ रोजी मी त्यांच्याकडे पहिला राग शिकायला सुरुवात केली. तो राग होता 'भूपनट'! त्या वेळी संगीतातील काहींनी त्यांच्यावर टीका केली होती. अनेकांना त्यांच्याकडे शिकायचे होते, मात्र त्यांनी कधीच कोणाला शिकवण्याचा विडा उचलला नाही. माझ्यासाठी ते खूप लोकांशी भांडले. त्यांनी मला १२ वर्षे सातत्याने शिकवले. जाण्याआधी त्यांनी मला शेवटच्या वेळी भेटायला बोलावले होते. त्या वेळी ते म्हणाले की, 'बाबा, आप हमारी जिंदगीमें बहोत देरसे आये. २५ साल पहले मिलते तो बहोत कुछ सिखाता था. अब अगली जिंदगी में मिलेंगे.' त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात त्याही वेळी पाणी आलं होतं. खरंच, माझी पुण्याई म्हणून मला असे गुरू लाभले. पुढल्या जन्मीही तेच गुरू म्हणून लाभावेत, अशी प्रार्थना करतेय.
सुशिक्षित कलाकार होणं महत्त्वाचं
शिक्षणानंतर माझ्या आईनेही एका चित्रपटात काम केले. मात्र आईचा भर शिक्षणावर होता. ती नेहमी म्हणायची की, अशिक्षित कलाकार होण्यापेक्षा सुशिक्षित कलाकार होणे मला जास्त आवडेल. कुरुंदवाडच्या सीताबाई पटवर्धन हायस्कूलात जाणारी ती पहिली मुलगी होती. विशेष म्हणजे त्या वेळी शाळेत आईशिवाय सगळी मुलंच शिकत होती. मात्र आईच्या मॅट्रिकचा रिझल्ट लागला, तेव्हा संपूर्ण शाळेमधून ती एकटीच पास झाली होती. १९७४मध्ये आई गेली. १९७६ला शाळेचा सुवर्णमहोत्सव साजरा करायचा होता. त्या वेळी त्या शाळेतील काही ज्येष्ठ शिक्षक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितले की, त्या वर्षी तुमच्या आई पास झाल्या नसत्या, तर शाळा बंद झाली असती. वडिलांमुळे गाण्याची शिकवण, तर आईमुळे शिक्षणाची परंपरा आमच्या घरात आली. वडील पलुस्कर आाणि भुर्जी खाँसाहेब यांचे शिष्य! उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांनीही त्यांना पुढे तालीम दिली. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये खानदानीपण आणि संस्कार ठासून भरले होते. वडिलांचं शिक्षण फार झालं नव्हतं. मात्र त्यांचं वाचन दांडगं होतं.  मला आठवतं की, घरी एखादी गोष्ट बांधून आणलेला कागदही ते टाकून देण्याआधी वाचत असत.
गळ्यात 'शुगर' पण फॅक्टरी नाही
श्रुती सडोलीकर-काटकर यांचे वडील कोल्हापूरातील एका साखर कारखान्याचे मालक होते, असा उल्लेख इंटरनेटवरील एका संकेतस्थळावर त्यांच्याबद्दलच्या माहितीत केला आहे. पण हे खरं नाही, असं स्पष्टीकरण श्रुतीताईंनी 'व्हिवा लाउंज'च्या मंचावर केलं. श्रुतीताईंचे वडील कोल्हापूरचे. त्या काळात कोल्हापूरमध्ये संगीत, नाटय़ आणि चित्रपट या कलांना प्रोत्साहन होते. कोल्हापूरमध्ये राममोहन लोहिया यांचा कोल्हापूर साखर कारखाना होता. लोहिया हे स्वत: नाटय़प्रेमी होते. त्यामुळे त्यांनी साखर कारखान्यात 'जीवन कल्याण' नावाचा एक विभाग सुरू केला होता. या विभागामार्फत नाटके बसवली जात. बहुतांश वेळा ती बसवण्याचे किंवा संगीत दिग्दर्शनाचे काम श्रुतीताईंचे वडील करत असत. त्यामुळे त्यांचा संबंध या साखर कारखान्याच्या मालकीशी जोडला गेला असावा, असा कयास श्रुतीताईंनी व्यक्त केला. गळ्यात थोडीफार मिठ्ठास असली, तरी साखर कारखान्याची मालकी वगैरे श्रीमंती घरात नव्हती, असं त्या म्हणाल्या.
संस्कारांची श्रीमंती वारसाहक्काने
माझा जन्म कुरुंदवाडला झाला. माझ्या आईचं माहेर कुरुंदवाड! त्या गावात ज्या घरात माझा जन्म झाला त्या घरासमोरील घरात उस्ताद रहिमतखाँ राहायचे. त्या घराच्या कट्टय़ावर बसून ते रियाज करायचे. आमच्या घरी आई आणि वडील हे दोघेही शास्त्रीय संगीताचे चाहते होते. वडील तर पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक! त्यामुळे गाण्याचे संस्कार जन्माच्याही आधीपासून होत होते. आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्याही घरांत संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य यांना पोषक वातावरण होते. आईची एक बहीण, आम्ही तिला तानीबाई म्हणायचो, ती उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांची शिष्या. एका आजारामुळे ती लवकर गेली. त्या वेळी उस्तादजी म्हणाले होते की, 'आज अल्लादियाँ गुजर गया है.. केसरको (केसरबाई केरकर) हमनें अपनी गायकीका चार आना भी नहीं दिया. लेकीन तानी हमारी गायकीका सोला आना लेके चली गयी.' सांगायचा मुद्दा, संगीताचे संस्कार गर्भावस्थेत होते, तेव्हापासूनच होत होते. प्रभात कंपनीतही आमचे शेअर्स होते. प्रभात कंपनीच्या चार-पाच मालकांपैकी एक म्हणजे केशवराव धायबर! ते म्हणजे माझ्या आईच्या आत्याचे पती! माझी एक मावशी वासंती म्हणजे पहिली बाल सिनेतारका! 'कुंकू', 'धर्मात्मा' वगैरे चित्रपटांत तिने काम  केलं होतं.

=======================================================================
सदर लेख शुक्रवार, २६  जुलै २०१३ च्या लोकसत्ताच्या 'व्हिवा' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार